पोस्ट्स

Featured Post

वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 6 गुन्हे उघड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  देहूरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 6 गुन्हे उघड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त   पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत देहूरोड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत देहूरोड पोलिसांनी एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 6 मोटारसायकली आणि 1 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे , सहआयुक्त शशिकांत महावरकर , अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड आणि अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिमंडळ-4 चे पोलीस उपआयुक्त यांच्या आदेशानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली. बिगर नंबर प्लेटमुळे संशय दि. 15 जानेवारी रोजी पेट्रोलिंगदरम्यान देहूरोड हद्दीत बिगर न...

अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी २०.५० लाखांची चोरी; बारामती पोलिसांकडून सात आरोपी अटकेत

इमेज
  अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी २०.५० लाखांची चोरी; बारामती पोलिसांकडून सात आरोपी अटकेत   बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारा वेळी भल्या मोठ्या गर्दीत गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती तालुका पोलिसांनी सात चोरट्यांना अटक केली आहे. राजकुमार बाबुराव आठवले , मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस , एजाज भगु मीरावले , मोहम्मद सादिक मोहम्मद गफार,बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, तुषार कैलास मासाळ,नितीन अंकुश गायकवाड आदी आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक आली आहे.  तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या चैन रोख रक्कम असा अंदाजे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्...

“जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे देशाच्या भवितव्याचा कौल” — महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसलाच संधी द्या : प्रशांत जगताप

इमेज
“जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे देशाच्या भवितव्याचा कौल” — महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसलाच संधी द्या : प्रशांत जगताप  पुरंदर :       निरा (ता. पुरंदर) येथे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर सभेत पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत, ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी असल्याचे ठामपणे सांगितले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राष्ट्रीय सुरक्षेवरून त्यांनी सरकारला जाब विचारत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.       “आज आपण ज्या निवडणुकीसाठी एकत्र आलो आहोत, ती केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही. ही आपल्या गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि थेट देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केले.       ते पुढे म्हणाले की, लोकसभेत खासदार कोणाचा आहे, विधानसभेत आमदार कोणाचा आ...

मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार. ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

इमेज
मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार.  ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात  पुरंदर :         देशाच्या पंतप्रधानपदाची ओळख पूर्वी प्रामाणिकपणा, समाजवाद आणि लोकशाही मूल्यांशी जोडली जात होती; मात्र सध्याच्या पंतप्रधानांची ओळख ‘सगळ्यात जास्त खोटं बोलणारा आणि फेकणारा नेता’ अशी झाली असल्याचा तीव्र आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरंदर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत भाजपचा कारभार म्हणजे ‘आजची औरंगजेबी प्रवृत्ती’ असल्याचे म्हटले.     पुरंदर तालुक्यातील निरा येथे झालेल्या सभेत सपकाळ  पुढं म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त पंतप्रधान अशी होती. माहिती अधिकार, अन्न सुरक्षा आणि शिक्षणाचा हक्क देत त्यांनी लोकशाही अधिक मजबूत केली. मात्र आजचे पंतप्रधान दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना दीडपट भ...

सामाजिक बांधिलकीची सशक्त ओळख : पत्रकार संजय सावंत यांना मा. साहेब प्रतिष्ठानचा कार्यगौरव पुरस्कार

इमेज
 सामाजिक बांधिलकीची सशक्त ओळख : पत्रकार संजय सावंत यांना मा. साहेब प्रतिष्ठानचा कार्यगौरव पुरस्कार जेजुरी | वार्ताहर समाजातील दुर्बल, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपत, मा. साहेब प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मानाचा कार्यगौरव पुरस्कार यंदा जेजुरी येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय सावंत यांना प्रदान करण्यात आला. श्री क्षेत्र जेजुरी येथे झालेल्या गौरवपूर्ण सोहळ्यात जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीपशेठ बारभाई व उपनगराध्यक्ष गणेशशेठ निकुडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गेल्या २६ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या पत्रकार संजय सावंत यांनी कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गरजू, वंचित व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. राज्यभरातील २३५ हून अधिक सामाजिक कार्यकर्ते, शिक...

दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी

इमेज
दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी  मुंबई :       महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असतानाच, त्या दु:खातूनच कर्तव्याचा नवा अध्याय सुरू झाला. दिवंगत दादांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी राजभवनात साध्या पण भावनिक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वैयक्तिक आघात बाजूला ठेवत, जनसेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला.         बुधवारी (दि. २८) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्याच रात्री सुनेत्रा पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळीच राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आणि सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ...

२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर

इमेज
२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर  मुंबई :         ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा झेंडा उंचावणाऱ्या पत्रकार संघांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण होणार असून, यानिमित्ताने राज्यातील तालुका अध्यक्षांचा भव्य मेळावाही संपन्न होणार आहे.       कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात सकाळी ११ वाजता हा सन्मानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.         ग्रामीण महाराष्ट्रात कार्यरत असलेले अनेक तालुका पत्रकार संघ केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत...