“२४ तास काम हाच आमचा अजेंडा; पुरंदरचा अखंड विकासच आमची ताकद” – प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा निर्धार
“२४ तास काम हाच आमचा अजेंडा; पुरंदरचा अखंड विकासच आमची ताकद” – प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा निर्धार पुरंदर : “निवडणूक आली म्हणून काम नाही, तर पाच वर्षे—बाराही महिने पुरंदरच्या विकासासाठी झटणे हाच आमचा अजेंडा आहे,” असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित सभेत केले. कडक उन्हातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहून, “शिवसेनेचा निष्ठावंत, शंभर टक्के बांधिल कार्यकर्ता आजही ताठ उभा आहे,” असा विश्वास शिवतारेंनी व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, “२४ तास काम आणि पुरंदरचा अखंड विकास हीच आमची एकमेव स्ट्रॅटेजी आहे,” असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. यावेळी उमेदवारांचा उल्लेख करत, “हे फक्त उमेदवार नाहीत, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा धनुष्यबाण आहे,” असे सांगण्यात आले. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात २४...