पोस्ट्स

Featured Post

भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका

इमेज
 कापूरहोळ थरारलं! भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका नीरा | ता. पुरंदर | पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी अक्षरशः हादरला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या अवघ्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि काही क्षणांतच भीतीचं सावट संपूर्ण परिसरावर पसरलं. मात्र, नीरा दूरक्षेत्र आणि जेजुरी पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे काही तासांतच या थरारक प्रकरणाचा सुखद शेवट झाला. पांढऱ्या XUV700 मधून अपहरण; गावात खळबळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची (XUV700) MH 12 XE 5353 क्रमांकाची कार कापूरहोळमध्ये आली आणि क्षणात युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पसार झाली. हा प्रकार इतक्या वेगात घडला की साक्षीदारही थक्क झाले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले,  संबंधित मुलाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल करून लोकांकडे मदत मागितली होती. जेऊर मांडकी आणि निरा परिसरामध्ये हा कॉल केला गेला होता. त्यामुळे या भागातील स्थानिक लोक देखील सतर्क झाले होते. त्यांनी देखील पोलिसांना तातडीन...

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

इमेज
कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई पुरंदर :      पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ (ता.भोर) मध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या एका थरारक अपहरणप्रकरणाने संपूर्ण परिसराला अक्षरशः हादरवून सोडलं. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाला भरदिवसा काळ्या XUVमधून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि काही क्षणांत गावात भीतीचं सावट दाटून आलं. पण काही तासांतच पोलिसांनी उभारलेल्या ‘सर्जिकल नाकाबंदी’मुळे चित्र पालटलं—आणि युवकाची सुखरूप सुटका झाली.  क्षणात घडलेलं अपहरण, गावात खळबळ       दुपारचा नेहमीसारखा गजबजलेला वेळ. कापूरहोळच्या मुख्य रस्त्यावर अचानक एक काळी XUV थांबते… काही क्षणांची झटापट… आणि युवकाला जबरदस्तीने गाडीत बसवून वाहन भरधाव वेगाने निघून जातं. हा प्रकार इतक्या झपाट्याने घडला की परिसरातील लोक स्तब्ध झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश पसरवण्यात आला आणि गावागावातून सतर्कतेचे सायरन वाजू लागले.  ‘ऑपरेशन नाकाबंदी’ — रस्ते सीलबंद  म...

सोमेश्वरची सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम पण किती असेल दर? गाळप पूर्णत्वाकडे ; किती लाख मे. टन गाळप झाले, किती लाख क्विंटल साखर, अल्कोहोल आणि वीज युनिट्स किती निर्माण झाले.

इमेज
सोमेश्वरची सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम पण किती असेल दर?   गाळप पूर्णत्वाकडे ; किती लाख मे. टन गाळप झाले, किती लाख क्विंटल साखर, अल्कोहोल आणि वीज युनिट्स किती निर्माण झाले.  सोमेश्वरनगर :          “सोमेश्वर कारखाना यंदाही सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम ठेवणार असून सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि अधिक दर देण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे चालू गाळप हंगाम यशस्वीरित्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.          कारखान्याने आजअखेर एकूण ११,४४,५१२ मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. बी-हेवी वगळता सरासरी ११.८७ टक्के साखर उतारा राखत १३,४३,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. तसेच डिस्टिलरी प्रकल्पामधून ४८,६०,५३३ लिटर्स अल्कोहोल निर्मिती झाली असून सहविज निर्मिती प्रकल्पातून ६,४९,६०,४८० युनिट्स वीज महावितरण कंपनीस विक्री करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.  ऊसदर व अनुदानाची सविस्...

मेंढपाळ पालकांचा मुलगा बनला एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट; संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी

इमेज
मेंढपाळ पालकांचा मुलगा बनला एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट;  संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी  पुरंदर :         प्रत्येक यशामागे संघर्षाची एक कहाणी दडलेली असते. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत एका मेंढपाळ कुटुंबातील मुलाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. अर्जुन बिरा महानवर याची भारतीय स्टेट बँकेत (SBI) ज्युनिअर असोसिएट (JA) पदावर निवड झाली आणि मेंढपाळांच्या झिरिपवस्तीत आनंद साजरा झाला.      पुरंदर तालुक्याच्या गुळूंचे कर्नलवाडी येथील झिरिपवस्तीतील अर्जुनचे आई-वडील पारंपरिक पद्धतीने मेंढ्या राखून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ग्रामीण आणि साध्या वातावरणात वाढलेल्या अर्जुनने लहानपणापासूनच शिक्षणाला प्राधान्य दिले. घरची परिस्थिती मर्यादित असतानाही त्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले. अनेक अडचणी, अभाव आणि संघर्ष असूनही त्याने हार मानली नाही.     अर्जुनचे प्राथमिक शिक्षण पुरंदर तालुक्यातील झिरिपवस्तीच्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. मा...

इतिहासावर बुलडोझर नको!” निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हात टाकताच संताप उसळला; निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

इमेज
इतिहासावर बुलडोझर नको!” निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हात टाकताच संताप उसळला; निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा  पुरंदर :           पुरंदर तालुक्यातील निरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी दिल्याची माहिती समोर येताच निरा व पाडेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याशी ऐतिहासिक, धार्मिक आणि भावनिक नाते असलेल्या या पुलाला बुलडोझर लावण्याऐवजी त्याचे जतन व बळकटीकरण करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली असून, प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.            निरा नदीवरील हा दगडी पूल सुमारे १९२७ मध्ये वाल्हाचे अभियंता कृष्णा मांडके यांनी उभारल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील हा पूल वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी लाखो भाविकांच्या साक्षीने संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या पुलावरू...

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा; कोण राहणार प्रशासक, राज्य सरकारचा तात्पुरता तोडगा

इमेज
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच राहणार प्रशासक, राज्य सरकारचा तात्पुरता तोडगा  मुंबई :         राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयातील गुंता अखेर सुटला असून २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या लक्षात घेता प्रशासनात सातत्य राखण्यासाठी हा तात्पुरता उपाय करण्यात आला आहे.      राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत एकाच कालावधीत संपत असल्याने प्रशासक नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. जानेवारी २०२६ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर स्वतंत्र प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची अपुरी संख्या आणि ग्रामपंचायतींची मोठी संख्या यामुळे प्रशासनास अडचणी येण्याची शक्यता होती.        ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने सुधारित निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, ...

“मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले, आई-भावाची तक्रार खोटी” — भिगवण प्रकरणात तरुणीचे प्रतिज्ञापत्र; कुटुंबीयांचा अपहरणाचा आरोप कायम

इमेज
 “मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले, आई-भावाची तक्रार खोटी” — भिगवण प्रकरणात तरुणीचे प्रतिज्ञापत्र; कुटुंबीयांचा अपहरणाचा आरोप कायम       बारामती  इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून २१ वर्षीय तरुणी आणि संबंधित तरुण स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. तरुणीने पोलिसांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पूर्णपणे स्वेच्छेने जहीर शेखसोबत आल्याचे स्पष्ट केले आहे. प्रतिज्ञापत्रात तिने नमूद केले आहे की, “आमचे गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. माझ्यावर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. आई आणि भावाने दिलेली तक्रार खोटी आहे. मी सज्ञान असून पुढील आयुष्य जहीरसोबतच व्यतीत करणार आहे.” हजर होण्यापूर्वी काही राजकीय व्यक्तींनी केलेले आरोपही निराधार असल्याचे तिने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी मात्र तिच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तिच्या भावाने “बहिणीला जबरदस्तीने नेण्यात आले, आम्हाला मारहाण करून डोळ्यात चटणी फेकली,” असा आरोप करत मुलगी आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली आहे. तर मामाने...