पोस्ट्स

Featured Post

“१७ वर्षे मृत्यूचा महामार्ग… आणि सरकारला टोलची घाई!” मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू; पत्रकारांचा संताप उसळला, सरकारवर निष्काळजीपणाचा घणाघात

इमेज
“१७ वर्षे मृत्यूचा महामार्ग… आणि सरकारला टोलची घाई!”  मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू; पत्रकारांचा संताप उसळला, सरकारवर निष्काळजीपणाचा घणाघात  खारपाडा :          मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हजारो नागरिकांचे जीव गेले, लाखो प्रवासी त्रस्त झाले आणि कोकणाचा विकास अक्षरशः खिळून राहिला. मात्र एवढ्या गंभीर वास्तवाकडे डोळेझाक करत सरकारने अपूर्ण महामार्गावरच टोलवसुली सुरू केल्याने संतापाची लाट उसळली आहे. “रस्ता पूर्ण नाही, पण टोल मात्र पूर्ण!” अशा शब्दांत पत्रकारांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेत खारपाडा येथे उग्र आंदोलन छेडले. तब्बल २० वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकारांनी आता सरकारला थेट इशारा दिला आहे.         अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात ३०० हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते. काळे शर्ट, काळ्या टोप्या आणि सरकारविरोधी फलक हातात घेत पत्रकार रस्त्यावर उतरले तेव्हा स्...

पत्रकारितेतील गुणवंतांना गौरवाचा मान; अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून पुरस्कारांसाठी नावे मागविण्याचे आवाहन

इमेज
पत्रकारितेतील गुणवंतांना गौरवाचा मान; अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून पुरस्कारांसाठी नावे मागविण्याचे आवाहन  मुंबई :        मुंबईत मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, विविध पुरस्कारांसाठी पात्र पत्रकारांची नावे ५ मेपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.       अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दरवर्षी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर पत्रकारांचा सन्मान विविध पुरस्कारांनी केला जातो. यंदाही या परंपरेनुसार पुरस्कार वितरण सोहळा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.          या पुरस्कार सोहळ्यासाठी पात्र पत्रकारांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. परिषदेच्या वतीने २५ हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. तसेच काह...

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध; श्रीकांत बोरावके अध्यक्ष, अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष

इमेज
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध; श्रीकांत बोरावके अध्यक्ष, अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष  आळंदी :          अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई तथा पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड या संघाची द्विवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके तर कार्याध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत एकूण २५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून पत्रकार बांधवांकडून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.           अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल शिंदे तर सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भरत निगडे यांनी निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.          ही निवडणूक आळंदी-मोशी रोडवरील डूडूळगाव येथील दीप बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार प...

कर्तव्यात तत्पर नेतृत्व! २४ तासांत पाणी योजना पुन्हा सुरू; उपसरपंच राजेश काकडे यांची धडाडी. निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा झाला होता खंडित.

इमेज
कर्तव्यात तत्पर नेतृत्व! २४ तासांत पाणी योजना पुन्हा सुरू; उपसरपंच राजेश काकडे यांची धडाडी.  निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा झाला होता खंडित.  पुरंदर :         पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकित बिलामुळे खंडित झाल्यानंतर गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र उपसरपंच राजेश काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांच्या तत्परतेमुळे अवघ्या २४ तासांतच वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.         निरा शिवतक्रार गावात शुक्रवारी अचानक पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे वीजबिल थकित असल्याने वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला होता. परिणामी गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.      मात्र, अशा संकटाच्या वेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीने पुढाकार घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी संबंधित...

“पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा” – एस. एम. देशमुख राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी

इमेज
“पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा” – एस. एम. देशमुख  राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी  मुंबई :        महाराष्ट्रात पत्रकारांवर वाढत्या दबावाच्या आणि दडपशाहीच्या घटना चिंताजनक स्वरूप धारण करत असून, हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच बाधा आणणारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सत्य व निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.        अकोला येथे टीव्ही 9 चे बातमीदार गणेश सोनोने, सामच्या बातमीदार हर्षदा सोनोने यांच्यासह पाच पत्रकारांना हक्कभंग समितीकडून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका आमदारासंदर्भात वस्तुनिष्ठ बातमी दिल्यामुळे अशी कारवाई करण्यात येणे अत्यंत धक्कादायक असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात सत्य मांडू नये, असा अप्रत...

पुरंदर तालुका काँग्रेसकडून गॅस दरवाढ व फसव्या कर्जमाफीविरोधात आंदोलनाचा इशारा तालुक्यातील सासवड, पिसर्वे, वाल्हे, परिंचे, वीर, निरा या गावांत होणार निदर्शने.

इमेज
पुरंदर तालुका काँग्रेसकडून गॅस दरवाढ व फसव्या कर्जमाफीविरोधात आंदोलनाचा इशारा  तालुक्यातील सासवड, पिसर्वे, वाल्हे, परिंचे, वीर, निरा या गावांत होणार निदर्शने. पुरंदर :        गॅसच्या किमतीत झालेली भरमसाठ दरवाढ, गॅस वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी दिली आहे.          पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने युवा नेते दत्ता झुरुंगे, सुनील असवलीकर व प्रा. सचिन दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध ठिकाणी निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गॅस व शेती खतांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच राज्य शासनाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याविरोधात शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून नागरिक, महिला, युवक तसेच ...

सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनकडून सभासदांची दिशाभूल ? : सतीश काकडे यांचा आरोप अनुदाना बाबत ही प्रश्नचिन्ह

इमेज
  सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनकडून सभासदांची दिशाभूल ? : सतीश काकडे यांचा आरोप  अनुदाना बाबत ही प्रश्नचिन्ह   ऊस  तोडणी साठी जादा खर्चामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेल्या उस अनुदानाबाबत सभासदांची दिशाभूल होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कृती समितीचे श्री सतीशराव काकडे यांनी केला आहे. कारखान्याने उस गाळपासाठी दिलेले अनुदान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून उलट त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, कारखान्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या उसाला १०० रुपये प्रतिमेट्रिक टन, मार्च महिन्यात २०० रुपये आणि एप्रिल महिन्यात ३०० रुपये प्रतिमेट्रिक टन अनुदान जाहीर केले होते. मात्र, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच कारखाना बंद होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील अनुदान कोणाला मिळणार, असा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी महिन्यात सोमेश...