वीर धरणाचा विसर्ग वाढवला निरा नदिच्या पात्रात विक्रमी पाणी. निरा खोऱ्यातील धरणात ९६.७६ टक्के पाणीसाठा भाटघर १०० टक्के, निरा देवघर ९८.२८ टक्के, गुंजवणी ७८.६२ टक्के तर वीर ९३.९० टक्के भरले.

वीर धरणाचा विसर्ग वाढवला निरा नदिच्या पात्रात विक्रमी पाणी. निरा खोऱ्यातील धरणात ९६.७६ टक्के पाणीसाठा भाटघर १०० टक्के, निरा देवघर ९८.२८ टक्के, गुंजवणी ७८.६२ टक्के तर वीर ९३.९० टक्के भरले. पुरंदर : गेली दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे निरा नदिच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. काल रविवारी निरा देवघर व भाटघर धराणत मोठ्याप्रमाणात पाणी वाढल्याने या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचा परिणाम वीर धरणाच्या पाणीसाठा वाढला. त्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. वेळोवेळी या निसर्गात वाढ करत रात्री दहा नंतर तब्बल ३३ हजार ५५२ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज सोमवारी दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता १ हजार ८०० क्युसेक्सने सुरू करण्यात आला होता. तो दुपारी १२ वाजता वाढवून ६ हजार २३८ क्युसेक्सने करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता पुन्हा वाढवून १० हजार ८०० क्युसेक्सने, ...