Posts

Featured Post

वीर धरणाचा विसर्ग वाढवला निरा नदिच्या पात्रात विक्रमी पाणी. निरा खोऱ्यातील धरणात ९६.७६ टक्के पाणीसाठा भाटघर १०० टक्के, निरा देवघर ९८.२८ टक्के, गुंजवणी ७८.६२ टक्के तर वीर ९३.९० टक्के भरले.

Image
 वीर धरणाचा विसर्ग वाढवला  निरा नदिच्या पात्रात विक्रमी पाणी.  निरा खोऱ्यातील धरणात ९६.७६ टक्के पाणीसाठा भाटघर १०० टक्के, निरा देवघर ९८.२८ टक्के, गुंजवणी ७८.६२ टक्के तर वीर ९३.९० टक्के भरले.  पुरंदर :        गेली दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे निरा नदिच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. काल रविवारी निरा देवघर व भाटघर धराणत मोठ्याप्रमाणात पाणी वाढल्याने या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचा परिणाम वीर धरणाच्या पाणीसाठा वाढला. त्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. वेळोवेळी या निसर्गात वाढ करत रात्री दहा नंतर तब्बल ३३ हजार ५५२ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे निरा नदी दुथडी भरून वाहत आहे.       वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज सोमवारी दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता १ हजार ८०० क्युसेक्सने सुरू करण्यात आला होता. तो दुपारी १२ वाजता वाढवून ६ हजार २३८ क्युसेक्सने करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता पुन्हा वाढवून १० हजार ८०० क्युसेक्सने, ...

महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Image
 महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार   जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा  बारामती ( पुणे)    महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी देते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केले आहे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत. त्यामुळे पुढील काळात असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं असा इशारा हाके यांनी दिला आहे.   लक्ष्मण हाके हे शनिवारी रात्री पुरंदर तालुक्यातील निरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. हाके यांनी यावेळी अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटि...

UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांच्यात शैक्षणिक अदानप्रदान कार्यक्रमासाठी सामंजस्य करार.......

Image
 UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांच्यात शैक्षणिक अदानप्रदान कार्यक्रमासाठी सामंजस्य करार....... UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांना हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम हायर अँड स्किल एज्युकेशनमध्ये शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. उत्कृष्टतेच्या दोन्ही संस्थांमधील या सामंजस्य करारात अभिव्यक्ती, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आदानप्रदान कार्यक्रम, नवीन ट्रेंड आणि औद्योगिक पद्धतींचे संशोधन आणि विकास, इंटर्नशिप आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश असेल. UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी लीम जुनवाई जोएल यांनी या सामंजस्यकरारावर स्वाक्षरी केली. UEI हाबर्ग्रुएनहोल्डिंग्ज (यूएसए) आणि जे एम फायनान्शियलचा संयुक्त उपक्रम आहे.२० वर्षांच्या हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम ...

यूईआय ग्लोबल कॉलेज मध्ये “सबोर द अवध !” म्हणजेच मेक्सिकन आणि अवधी फूड फेस्टिवलचे आयोजन.

Image
 यूईआय ग्लोबल कॉलेज मध्ये “सबोर द अवध !” म्हणजेच मेक्सिकन आणि अवधी फूड फेस्टिवलचे आयोजन.  पुणे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवाजीनगर येथील यूईआय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आज विद्यार्थ्यांनी आणि शेफ यांनी मिळून फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते -सबोर द अवध! म्हणजेच मेक्सिकन आणि अवधी पाककृतींचे मिश्रण या थीम वेळेस फूड फेस्टिव्हलमध्ये होती.प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सुमारे शंभरहून अधिक नवीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले विविध पदार्थ आपल्या पालकांना आणि पाहुण्यांना बनवून दिले आणि त्याचा त्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.  मेक्सिकन आणि अवध प्रांतातील विविध व्यंजन यावेळी तयार करण्यात आले होते. यामध्ये स्टार्टरमध्ये, पापडी नाचोस सहस्मो की लेंटेजास .मेनकोर्स मध्ये चिकन गॅलवारी एन्चिलाडास,पनीर गॅलवारी एन्चिलाडास, जलापेनो, चटणी पॉपर्स ,चटपटा सालसा ,मेक्सिकन नवाबी राईस आणि डेझर्टमध्ये चुरोरबडी असे चविष्ट पदार्थ या फूड फेस्टिव्हलसाठी आलेल्या पाहुण्यांना चाखता आले. महाविद्यालयाचे शिक्षक,वैशाली पाटील- चव्हाण,दिल्लीचे शेफ अभिजित चंडीगढचे शेफ दिवाकरण,शेफ आनंद, शेफ रि...

"पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आणि निषेधार्ह" : एस. एम. देशमुख कर्जत येथील प्रकार : बदनामी केली म्हणत पोलिसांकडे तक्रार.

Image
"पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आणि निषेधार्ह" : एस. एम. देशमुख  कर्जत येथील प्रकार : बदनामी केली म्हणत पोलिसांकडे तक्रार.  मुंबई :         पत्रकारिता करणे महाराष्ट्रात उत्तरोत्तर कठीण होत आहे. पत्रकारावर हल्ले होताहेत, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे माध्यम विश्वात मोठी अस्वस्थत: आहे. कर्जत येथील संवाद मराठी चँनलच्या पत्रकार बाबू पोटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आहे. या घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद, रायगड प्रेस क्लब आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असल्याचे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे     कर्जत येथून आलेली बातमी अशीच आहे. खालापूर तालुक्यातील सावरोली येथील के. डी. एल. बायोटेक औषध उत्पादन कंपनी बंद होऊन बारा वर्षे झाली तरी कामगारांना त्यांचा हिशोब मिळत नाही. त्या विरोधात कामगारांनी २ जुलै २०...

नीरा नदीतल पाणी वाढतंय. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

Image
 नीरा नदीतल पाणी वाढतंय.  नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग  लोकमत न्यूज नेटवर्क  नीरा :  नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उसंती घेतल्याने मागील रविवारपासून (दि.२० जुलै) विर धरणातून विसर्ग बंद केला होता. मात्र गुरुवारपासून (दि.२४) पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काल शनिवारी २.३० वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ३१८ क्युसेक्सने, आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला आहे.  आज चारही धरणांच्या भांड्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.         नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेले नीरा देवधर धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून ४ हजार १३० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून भाटघर धरणाच्या अस्वयंचलित द्वारांतून सांडव्याद्वारे ४ हजार क्युसेक्सने तर विद्यूत निर्मिती केंद्रातून...

"महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" : एस. एम. देशमुख. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन

Image
"महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" : एस. एम.  देशमुख.  पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन  पुरंदर :        "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मभूमी परिसरात हे आधुनिक पत्रकार भवन उभे राहात असल्याचा विशेष आनंद आम्हाला आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सुसज्ज असे पत्रकार भवन उभे राहात आहे. साडेचार - पाच कोटी रूपयांच्या खर्चातून हे अत्याधुनिक असे पत्रकार भवन उभे राहात आहे, ही बाबा सोपी नव्हे. भूखंडापासून निधी उभारणीपर्यंत अनेक अडथळ्यांवर मात करीत अध्यक्ष योगेश कामथे आणि त्यांच्या टीमने पत्रकार भवनाचे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले.          पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्य...